– कोमल गौतम

.चक्रिघाट बेडा आता स्थलांतरित होऊन पुन्हा आपल्या जागी परत आला आहे. पावसाळा लागल्यामुळे उन्हाळ्यात झालेलं स्थलांतर थांबून, आता सर्व कुटुंबं आपल्या झोपड्यांमध्ये परतली आहेत.
त्यांच्या झोपड्याही पुन्हा बांधून तयार झाल्या आहेत. त्याचबरोबर आमचं बेड्यावर वर्ग घेणंही पुन्हा सुरू झालं आहे. मागील वर्षीच्या स्थितीच्या तुलनेत यावर्षी मुलांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण झाली आहे. मागच्या वर्षी, जेव्हा आम्ही बेड्यावर शिकवायला जायचो, तेव्हा मुलं फारशी उत्साहाने येत नव्हती. ते उशीर करत होती, काहीजण यायलाच टाळाटाळ करत होते. शिक्षणात फारशी रुची नव्हती. “मुझे नहीं पढ़ना”, “मुझे नहीं लिखना” असे बोलणं, एकमेकांशी भांडणं, मारामारी करणं असंच काहीसं वातावरण होतं. बऱ्याचशा अॅक्टिव्हिटींमध्येही ते सहभाग घेत नव्हते.
पण यावर्षीचं चित्र पूर्णपणे वेगळं आहे. मी आणि नविनता पहिल्याच दिवशी बेड्यावर पोहोचलो, तर मुलं आधीच आंघोळ करून, नीटनेटकं तयार होऊन बसलेली होती. त्यांनी आम्हाला पाहताच उत्साहाने सांगितलं “हम तो आपके पहले ही आ गए, मैडम। “हमें अभी पढ़ाओ!”
तेव्हा मला लगेच मागच्यावर्षीची परिस्थिती आठवली. उन्हाळ्यामध्ये ‘रिआज’ घरामध्ये घेतले गेलेले वर्ग, साहसी भेटी (adventure visits), बाह्यभेटी (external visits), आणि नव्या-नव्या गोष्टी शिकण्यासाठी दिलेल्या संधी यांचा मोठा वाटा आहे. या सगळ्या उपक्रमांमुळे मुलांमध्ये केवळ शिकण्याची आवडच निर्माण झाली नाही, तर त्यांनी शिकण्याचा आनंदही अनुभवला.
आज पहिल्याच दिवशी मुलं स्वतःहून शिकण्यासाठी इतकी उत्सुक आहेत! त्यांची ही बदललेली वृत्ती पाहून खूप आनंद झाला. त्यामुळे आम्ही पहिल्याच दिवशीपासून बेड्यावर वर्ग घ्यायला सुरुवात केली.
आता दररोज सकाळी १० वाजता मुलं उत्साहाने, हसत-खेळत शिकण्यासाठी तयार असतात.
पुस्तकांपलीकडचं शिक्षण, अनुभवातून मिळणाऱ्या शिकवणींचं महत्त्व, आणि गमतीशीर अॅक्टिव्हिटीजमुळे त्यांचं शिक्षणाकडे पाहण्याचं दृष्टीकोनच बदलला आहे.
त्यामुळे आज ही मुलं उत्साहाने वर्गात सह